मुंबईत झाडांची संख्या वाढविण्यासाठी 65 उद्यानाचे घनदाट जंगलामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. ‘मियावाकी’ वनीकरण पद्धतीने दाट शहरी वनीकरण करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. काय आहे ही ‘मियावाकी’ पद्धत? तर, अकीरा मियावाकी या जापानमधील वनस्पति शास्त्रज्ञाने विकसित केलेली ही अनोखी पद्धत आहे. या पद्धतीने जंगलांना अतिशय कमी कालावधीत घनदाट जंगलात रूपांतरित करता येते. चला तर, जाणून घेऊयात या ‘मियावाकी’ पद्धतीबद्दल.
ओसाड / रिकाम्या भूभागवर जलद गतीने जैव विविधता राखून वृक्ष संपदा रुजवणे व तीचे संवर्धन करणे हा ‘मियावाकी’ चा उद्देश असतो. जमीनीचा पट्टा निश्चित केल्यावर तो २ ते 3 फुट खणुन घेतात. निघलेल्या मातीत सेन्द्रिय खत मिसळतात. ही खत मिश्रित माती पुनश्च खड्ड्यात भरून जमीनीचा पट्टा पूर्ववत करतात. काही दिवस पाणी फवारून जमीन लागवडी योग्य करून घेतात. नंतर रोपांची लागवड केली जाते.
लागवड करताना जातींची सरमिसळ हेतूपूर्वक केली जाते. कारण नैसर्गिक जंगल असेच असते. लागवड झाल्यावर जमिनीवर रोपांच्या सभोवती पालापाचोळा पसरवतात. असे केल्याने जमीनीतील पाणी उन्हाने वाळून जात नाही. ह्या लगावडीला नियमित पाणी द्यावे लागते. वृक्षाच्या जाती, जमीनीची प्रत व त्याभागात असलेल्या भूजल प पातळी वरून किती काळ पाणी देणे आवश्यक आहे हे ठरविले जाते. वनाची वाढ जलद गतीने होते है निश्चित. साधारण तीन एक वर्ष काही प्रमाणात पाणी द्यावे लागते.
वैशिष्ट्ये :
* या पद्धतीत, मूळ प्रजातींची झाडे एकमेकांच्या अगदी जवळ लागवड केली जातात, ज्यामुळे कमी जागा व्यापल्यामुळे इतर वनस्पतींच्या वाढीस देखील मदत होते.
* घनतेमुळे ही झाडे पृथ्वीवर सूर्यप्रकाशापासून रोखतात, जेणेकरून पृथ्वीवर तण वाढू शकत नाही. या वनस्पतींना तीन वर्षानंतर काळजी घेण्याची आवश्यकता नाही.
* रोपांची वाढ 10 पट वेगवान असते. परिणामी वृक्षारोपण सामान्यपेक्षा 30 पट कमी असते.
* पारंपारिक पद्धतीने वाढण्यास जंगलांना सुमारे 200 ते 300 वर्षे लागतात, तर ती केवळ मियावाकी पद्धतीने 20 ते 30 वर्षांत वाढू शकतात.
या पद्धतीने वर्षभरात चार लाख झाडे लावण्याचा संकल्प मुंबई महापालिकेने सोडला आहे. तेलंगणा सरकारने शहरी भागात वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जपानी वृक्षारोपण ‘मियावाकी पद्धत’ च्या धर्तीवर ‘तेलंगानाकू हरिता हरम’- टीकेएचएच योजना सुरू केली आहे.