किनवट – सेवानिवृत्त सीआरपीएफ जवानाने एका विवाहत महिलेच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना किनवट तालुक्यातील बुरकूलवाडी मध्ये घडली आहे. मुलीच्या प्रेमविवाहासाठी मदत केल्याचा राग मनात धरून हे टोकाचे पाऊल वडिलांनी उचलले आहे.
बेबीताई भीमराव चव्हाण वय 40 असे मृत महिलेचे नाव आहे. तर सुरेश धनसिंग राठोड असे खून करणाऱ्या सेवानिवृत्त सीआरपीएफचे जवानाचे नाव आहे. महिलेचा खून केल्यानंतर राठोड स्वत: इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. चव्हाण यांच्या मुलाकडून इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राठोड यांच्या मुलीचा गावातील एका मुलासोबत प्रेमविवाह झाला होता. या प्रेमविवाहास गावातील बेबीताई कारणीभूत असून त्यांच्यावर राठोड यांचा दाट संशय होता. या कारणामुळे यांच्यात बऱ्हाच वेळा वादही झाले होते. मी तुला सोडणार नाही, तुला कधी ना कधी बघून घेतो, असे म्हणून राठोड यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत दिली होती. त्यातूनच हा खून झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा
करोनाने संपूर्ण कुटुंब केले उद्ध्वस्त; एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू
केमिकल टँकर आणि ट्रकची समोरासमोर टक्कर, भीषण आग लागून 2 जणांचा होरपळून मृत्यू