नवी दिल्ली: आम आदमी पक्षाने (आप) दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मोठ्या संख्येने विजय मिळविला. निवडणुकीच्या निकालानुसार आणि आपापल्या प्रचारानुसार आपने दिल्लीत ६० पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. 21 वर्षानंतर दिल्लीत पुन्हा सत्तेत येण्याच्या भाजपच्या स्वप्नावर आपने पुन्हा एकदा ‘झाडू’ फिरवला.
आपच्या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या की माझ्या वाढदिवशी मला मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे. हा सत्याचा विजय आहे. माझ्या मते विकासाच्या मुद्द्यांच्या आधारे राजकारण व्हायला हवे. विजय होईल असे मी गृहित धरले होते. हा सत्याचा विजय आहे.
तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की दिल्लीतील लोकांनी एक नवीन प्रकारचे राजकारण सुरू केले आहे. ते म्हणाले की आज मंगळवार सुद्धा आहे. हनुमानजी यांचे मनापासून आभार. त्यांनी आम्हाला पुढील पाच वर्षे दिल्लीच्या लोकांची सेवा करण्याचे सामर्थ्य दिले पाहिजे. हा माझा विजय नसून दिल्लीतील जनतेचा विजय आहे.