Nitish Kumar in Vidhan Sabha। बिहार विधानसभेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. महाआघाडीच्या आमदारांनी सभागृहात वेलमध्ये आल्यानंतर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भाजप आमदार शैलेंद्र यांच्या वक्तव्यामुळे महाआघाडीचे आमदार संतप्त झाले. भाजप आमदार शैलेंद्र यांनी आरजेडी आमदार रामवृक्ष सदा यांच्याविषयी असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दलिताचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येतोय.
“आमच्या मुर्दाबादचा अन् तुमच्या जिंदाबादचा नारा देत रहा Nitish Kumar in Vidhan Sabha।
अधिवेशात आज झालेल्या गोंधळादरम्यान महाआघाडीचे आमदार नितीश कुमार मुर्दाबादच्या घोषणा देऊ लागले. यावर नितीशकुमार चांगलेच संतापले. नितीश कुमार म्हणाले की, आमच्या मुर्दाबादचा आणि तुमच्या जिंदाबादचा नारा देत राहा.असे आता करा आणि पुढच्या वेळी आणखी कमी संख्येने निवडून या असा टोला नितीशकुमार यांनी लगावला. मात्र, महाआघाडीचे आमदार काही ऐकायला तयार नव्हते. घोषणाबाजी करत राहिले. सदनाच्या आतमध्ये वेलमध्येच संपावर बसले.
‘नितीश चुकीचे विधान करत आहेत’ Nitish Kumar in Vidhan Sabha।
या गोंधळानंतर महाआघाडीच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला. विधानसभा संकुलात आरजेडीचे आमदार भाई वीरेंद्र म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी कोणताही अधिकारी काम करत नाही. आज पुन्हा आवाज उठवायचा होता. सीएम नितीश कुमार यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या आदेशाचे पालन झाले नाही आणि नितीश कुमार उभे राहून चुकीची विधाने करत आहेत.
10 ते 4 या वेळेत शाळा सुरू राहतील, मात्र शिक्षकांना दिलेले आदेश पूर्वीप्रमाणेच राहतील, असे पत्रात लिहिले आहे. म्हणजे 8.30 पर्यंत शिक्षक शाळेत पोहोचतील. हा तुघलकीचा आदेश आहे. असे वीरेंद्र यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्र्यांना एक मिनिटही आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. काल आमच्या एका आमदाराचा भाजपच्या एका आमदाराने अपमान केला. असंसदीय भाषा वापरली आहे. त्यांचे कामकाजही तहकूब करण्यात आले परंतु सभागृहात तहकूबही वाचू दिले गेले नाही. ही कसली लोकशाही? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.