प्रसिद्ध कार्यकर्त्या आणि जेएनयूएसयूच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शेहला रशीदने पुन्हा एकदा काश्मीरबाबत मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्ट शोमध्ये संपादक स्मिता प्रकाश यांच्याशी बोलताना शेहला रशीद म्हणाल्या की, या सरकारने काश्मीरमध्ये ज्या प्रकारे काम केले आहे ते कौतुकास्पद आहे.
शेहला रशीद म्हणाल्या की, कोणीतरी पुढे येऊन काम करायला हवे होते आणि हे सरकार त्यात यशस्वी झाले आहे. पत्रकाराने शेहला रशीदला विचारले की, 2010 मध्ये तुमची सहानुभूती दगडफेक करणाऱ्यांशी होती? यावर उत्तर देताना शेहला रशीद म्हणाली, “हो, हे बरोबर आहे पण आजची परिस्थिती पाहिल्यावर मला समाधान वाटते, कारण आज हे स्पष्ट झाले आहे की काश्मीर गाझा नाही.”
शेहला रशीद म्हणाल्या, “काश्मीरमधील परिस्थिती चांगली नव्हती आणि तेथे बंडखोरी झाली. कोणीतरी पुढे पाऊल टाकून काम करायचे होते आणि त्याचे श्रेय मी सध्याच्या केंद्र सरकारला देते. विशेषत: पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना श्रेय मिळते कारण त्यांनी यावर राजकीय तोडगा काढला आणि हा उपाय रक्तरंजित नाही.’
यापूर्वी शेहला रशीदने सोशल मीडियावर श्रीनगरचा फोटो शेअर करून मोदी सरकारचे कौतुक केले होते. शहराचा कायापालट पाहून बरे वाटल्याचे असेही त्या म्हणाल्या आहे. शेहला रशीद पुढे म्हणाल्या की, ‘पादचाऱ्यांसाठी केलेली कामे आणि शहराच्या योग्य विकासाची ही चित्रे आहेत. सरकारने सर्वच घटकांची काळजी घेतली आहे.’