हानीकारक धुमकेतू फेकत असल्याचे नवे संशोधन
नवी दिल्ली : गुरू हा गोफणासारखा काम करत असून पृथ्वीच्या दिशेने हानीकारक पदार्थ सुर्यमालेमध्ये फेकतो. त्याचा पृथ्वीवर हानीकारक परिणाम होण्याची शक्यता असल्याचे वास्तव नव्या अभ्यासातून सामोरे आले आहे. यापुर्वी गुरू लहान ग्रहापासून पृथ्वीचे संरक्षण करत असल्याचे मानले जात होते. मात्र, नव्या संशोधनातून त्यापेक्षा अधिक हानी गुरू करत असल्याचे मानले जात आहे.
अवकाश तज्ज्ञ केविन ग्रेझियर यांनी गुरू ढाल सिध्दांतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या सिध्दांतानुसार कोणत्याही हानीकारक पदार्थापासून पृथ्वीची अवकाशातील ढाल बनलेला गुरू संरक्षण करतो, असे मानले जाते. मात्र ग्रेझियर यांनी गुरू पृथ्वीसाठी उपकारक असण्यापेक्षा हानीकारक अधिक असल्याचे अनेक शोधनिबंध प्रसिध्द केले आहेत.
प्रत्यक्षात मी हे संकट आहे, असे म्हणत नाही. पण तो सिध्दांत बाजूला ठेवलेलाच बरा, आमचे निरीक्षण असे सांगते, गुरू पृथ्वीच्या दिशेने धुमकेतू सोडतो. मात्र सौरमालिकेत आल्यानंतर त्याची दिशा बदलली जाते. असे अनेक धुमकेतू दिसलेले आहेत, असे ग्रेझियर यांनी स्पष्ट केले.
ग्रेझियर हे नासाच्या अवकाश संशोधानाशी सहकार्य करत आहेत. त्यांनी पृथ्वीला हानीकारक ठरू शकणारे धुमकेतू गुरू कसे सोडतो, याचे प्रात्यक्षिक दक्षिण क्विन्सलॅंड विद्यापीठात दाखवले. माझा सिध्दांत खरा असाला तरी काही वेळा गुरू पृथ्वीचे रक्षण करतो, हे त्यांनी मान्य केले.
जोमती हॉर्नर या अवकाश संशोधिकेने दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीवर कोणतेही धुमकेतू अथवा पदार्थ आदळण्यापासून काही तरी अशी गोष्ट पृथ्वीचे रक्षण करते हे खरे. मात्र गुरू हा उपकारक आहे की अपायकारक आहे, यावर संशोधन व्हायला हवे.
आपल्याला यापुर्वीच माहित आहे पृथ्वीला एक अच्छादन आहे. त्यामुळे पृथ्वीच्या सभोवताली शेकडो वस्तू असूनही पृथ्वीला हानी पोहचत नाही. पृथ्वी गुरूच्या कक्षेत आल्यानंतर काय घडते याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे, असे ग्रेझियर म्हणाले.