पुणे – समृद्धी महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातानंतर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) जागे झाले आहे. या रस्त्याकडेला आता सुविधा केंद्र निर्माण केली जाणार आहेत. यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
या प्रवासी सुविधा निर्माण करण्यासाठी “एमएसआरडीसी’ने निविदा काढल्या आहेत. प्रत्येक सुविधा स्थानासाठी किमान 50 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. तसेच 10-12 हेक्टर जागेवर या सुविधा विकसित होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वारझाडी आणि नाशिक जिल्ह्यात मार्गाच्या प्रत्येक बाजूने एक असे 4 सुविधा केंद्र विकसित करण्यात येईल. पुढील काळात 18 ठिकाणी असे केंद्र विकसित करण्यात येणार आहेत. खरं तर महामार्ग सुरू करण्याआधीच ही सुविधा केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. पण, उद्घाटनाची घाई केली आणि सुविधांच्या अभावामुळे आतापर्यंत या मार्गावर चारशेपेक्षा अधिक अपघात झाले आहेत. त्यात शंभरावर जणांचा जीव गेला आहे.
सुविधांमध्ये या बाबींचा समावेश
- सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पार्किंग, इंधन स्टेशन, वाहन चार्जिंग स्टेशन, वाहनांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी गॅरेज
- प्रवासी, वाहन चालकांसाठी : पदपथ आणि प्रवेश रस्ते, टॉयलेट, हिरवळ, विश्रांती बेंच, शौचालये
थंड पेये, पाणी, खाण्यायोग्य वस्तू, एटीएम - रेस्टॉरंट/फास्ट फूड : कॅफेटेरिया, जेवण, फास्ट फूड, विश्रांतीसाठी जागा (ट्रकचालकांसाठी स्वतंत्र क्षेत्र निश्चित)
- प्रथमोपचार, कचरा वेचक, औषधे, पर्यटक माहिती