नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील शेतकरी आंदोलनात वाहनाने काही शेतकऱ्यांना चिरडून टाकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
लखीमपूर खेरी इथल्या घटनेबद्दल सध्या जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. तसंच माफीची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्याचाही त्यांनी निषेध केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
‘प्रियांका गांधी यांच्याशी मोदी सरकारच राजकीय वैर असून शकते मात्र प्रियांका गांधींचा नेमका गुन्हा काय आहे ? त्यांना कोणत्याही वॉरंटशिवाय घटनास्थळावरून ताब्यात घेतलं गेलं ? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलिस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते.
ते पुढे म्हणाले,’ हे काही रामराज्य आहे का ? तुम्ही माफी मागत आहात का ? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मगितलीच पाहिजे. ‘