नवी दिल्ली, – नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या दोन सदस्यीय तपासणी पथकाला एअर इंडियाच्या अंतर्गत सुरक्षा ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्या आहेत आणि नियामक या प्रकरणाची चौकशी करत आहे, असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.
डीजीसीएला सादर केलेल्या तपासणी अहवालानुसार, एअरलाइनने केबिन पाळत ठेवणे, कार्गो, रॅम्प आणि लोड यासारख्या ऑपरेशन्सच्या विविध क्षेत्रांमध्ये नियमित सुरक्षा स्पॉट तपासणी करणे अपेक्षित होते परंतु 13 सुरक्षा बिंदूंच्या तपासणी दरम्यान, टीमला असे आढळले की विमान कंपनीने सर्व 13 प्रकरणांमध्ये खोटे अहवाल तयार केले.
याशिवाय, जेव्हा सीसीटीव्ही, रेकॉर्डिंग, ऑडीट स्टेटमेंट्स, शिफ्ट रजिस्टर दस्तऐवज, सामान्य घोषणा यादी, प्रवासी मॅनिफेस्ट इत्यादी बाबींची तपासणी केली गेली तेव्हा या तृटी आढळून आल्या आहेत. हे सर्व 13 स्पॉट चेक मुंबई, गोवा या विमानतळांवर केले गेले आहेत.
या बाबींविषयी एअर इंडियाकडे विचारणा केली गेली तेव्हा त्यांनी या संबंधीचे खोटे अहवाल सादर केल्याचेही लक्षात आले आहे. या अहवालांवर ज्या संबंधीतांनी स्वाक्षरी करण्याची गरज असते तीही केली गेलेली नाही. अनेक ठिकाणी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी किंवा तंत्रज्ञांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्पॉट चेक करण्याचीगरज असते तेथे हे लोक गेलेच नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
तपास पथकाने गुरूग्राम येथील एअर इंडियाच्या कार्यालयाला भेट देऊन तेथेही तपासणी केली.डीजीसीएचे महासंचालक विक्रम देव दत्त यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रकरणाची नियामकाकडून चौकशी केली जात आहे.