उपचाराच्या खर्चाने परिसरात रुग्ण बेजार
वालचंदनगर – वालचंदनगर परिसरामध्ये बदलत्या वातावरणामुळे हवेतील जंतू संसर्गजन्य आजारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी दिसत आहे.
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर, कळंब, कुरवली, निरवांगी परिसरातील गावांमध्ये ताप, चक्कर, डोकेदुखी, उलट्यासह अन्य आजारांचे रुग्ण आढळत आहेत. सध्या ढगाळ वातावरण, दुपारचे ऊन, पहाटे हुडहुडी आणि धुके, असे विचित्र हवामान पाहावयास मिळत आहे.
या वातावरणाच्या लहरीपणामुळे वालचंदनगर परिसरात डेंग्यू, गोचीडताप, मलेरिया यासह जंतूसंसर्ग रुग्ण आढळत आहेत. तसेच दवाखान्यात तपासणीसाठी येणारे रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ठिकठिकाणचा परिसर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.