मुंबई – वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतून रवीचंद्रन अश्विनला भारतीय संघातून वगळण्यात आल्यावर निवड समितीवर टीका होऊ लागली होती. मात्र, अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली होती. त्याला उपचारांसाठी तसेच पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी किमान सहा आठवड्यांचा कालावधी आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले होते.
तसेच मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ पाहिला तर संघात फिंगर स्पिन गोलंदाजांना जास्त संधी दिली गेल्याचे समोर येत आहे. रवी बिष्णोई, कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर या तीनही फिंगर स्पिन गोलंदाजांचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.