मोहाली :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी-20 सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आघाडी घेण्याची इच्छा आहे.
Australia win the toss and opt to bowl first 🏏
Tim David set to make his Australia debut 👊🏻#INDvAUS pic.twitter.com/zkVYg4sirj
— ICC (@ICC) September 20, 2022
भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघात काही बदल केले आहेत. तो म्हणाला की, संघातील काही खेळाडू जखमी आहेत. जसप्रीत बुमराह हा सामना खेळणार नाही. त्याचबरोबर ऋषभ पंतलाही संधी देण्यात आलेली नाही. अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि दिनेश कार्तिक हा सामना खेळत आहेत.
तर दुसरीकडे सिंगापूरचा अष्टपैलू खेळाडू टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 23 टी-20 सामने झाले आहेत. यापैकी भारताने 13 तर ऑस्ट्रेलियाने 9 सामने जिंकले आहेत. एक सामना निकालाविना संपला. भारतात खेळताना ऑस्ट्रेलियाने 3 सामने जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत.
भारतीय संघाची प्लेइंग-11 :-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमेश यादव, युझवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग-11 :-
अॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.