कोल्हापूर – रात्री शेतामध्ये पाणी पाजत असताना साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर अशासारखे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता त्यांना ताब्यात घेऊन आणि जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी कार्यालयात आणून सोडावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले होते.
राजू शेट्टींनी केलेल्या आवाहनानंतर रात्रपाळीला पाणी पाजवत असताना सापडलेले साप अज्ञात शेतकऱ्यांनी शिरोळच्या तहसील कार्यालयात सोडल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता. त्यानंतर आज इचलकरंजी येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप सोडल्याची घटना घडली आहे.