भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमार
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करेल असे वाटत असताना भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी प्रत्यक्षात मात्र सुमार ठरली आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. यामुळे मोदी सरकारला हा धक्का असल्याचे मानले जात आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमारच आहे. भारताचा जीडीपी दर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच टक्क्यांवर घसरला. हा गेल्या सहा वर्षातला निचांक आहे याकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने लक्ष वेधले आहे.
जीडीपीचा दर 2019-20 या आर्थिक वर्षासाठी टक्के किंवा त्यापेक्षा काहीसा जास्त असेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र तसं घडलेलं नाही. जीडीपी दर पाच टक्क्यांवर घसरला आहे.मात्र तरीही भारतीय अर्थव्यवस्था जगातली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
सध्या भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीच चीनच्याही पुढे आह. भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेची ही सुमार कामगिरी सुधारेल आणि त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असे नाणेनिधीच्या प्रवक्त्या गेरी राईस यांनी स्पष्ट केले.