मुंबई – नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यामध्ये मंगळवारी राजकीय नाट्य रंगलं. राणे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर दुपारी त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील करण्यात आली होती.
मात्र राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मंगळवारच्या घडामोडींवर भाष्य केले. यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
यावरून आज माध्यमांशी बोलतांना त्यांनी तीव्र शब्दात आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले,’ नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहे त्यांनी कायदा हातात घेऊ नये. त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांबाबत जे विधान केले ते पूर्णपणे असंसदीय आहे. जर उदयाला कोणीही उठून चुकीच्या भाषेचा वापर करत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानशीलात वाजवेल’ असे म्हटले तर काय होईल. तर त्या व्यक्तीबद्दल मोदी सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करेलच ना ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ते हिंदी वृत्त वाहिन्यांना बोलतांना म्हणाले,’ विरोधी पक्ष म्हणतोय की हे सुडाचे राजकारण आहे? मात्र हे सुडाचे राजकारण कसे असणार ? तुम्ही जर महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उलंघन कराल तर तुमच्यावर कायदेशीररित्या कारवाई होणारच. असेही ते म्हणाले.