काबूल- तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी तो देश सोडून परांगदा झाले. हेलिकॉप्टरमध्ये रोकड भरून त्यांनी देशाबाहेर उड्डाण केले.यातच तालिबानने अफगाणचा ताबा घेतल्यानंतर अफगाणी नागरिकही देश सोडतांना दिसून आले. काबूल विमानतळावरील प्रचंड गर्दी ही तालिबानच्या अराजकतेची साक्ष देत आहे.
अनेक अफगाणी नागरिकांनी आपला जीवही गमावला. असे असतांना मात्र दुसरीकडे देशातील जनतेला विद्यमान उपराष्ट्रपती असणारे अमरुल्लाह सालेह यांनी धीर देण्याचं काम केलं आहे. विद्यमान उपराष्ट्रपती असणारे सालेह यांनी याआधीही तालिबानला मोठा विरोध केला आहे.
त्यांनी देश न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्थानिक वृत्त माध्यमांशी बोलतांना म्हंटले आहे की,’आम्ही सर्व अफगाणी नागिरक आमची लढाई स्वत: लढू शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू ..’
ते पुढे म्हणाले, आमचे राष्ट्रपती पळून गेले मात्र मी घाबरून पाळणार नाही. मी लढणार जे माझ्यावर विश्वास दाखवितात त्यांच्या सहकार्याने तालिबानविरूद्ध लढत लढणार, असंही सालेह म्हणाले आहेत.