मुंबई – 1984 साली ‘सारांश’ चित्रपटातून आपल्या करियरची सुरूवात करणारे अभिनेते ‘अनुपम खेर’ यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात प्रेमाचे घर निर्माण केले आहे. 7 मार्च 1955 साली शिमल्यातील एका काश्मिरी पंडित कुटुंबात अनुपम यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता बनण्याच्या इच्छेने अनुपम खेर मुंबईत आले. अनुपम यांनी आपल्या बहारदार अभिनयाच्या जोरावर कलाक्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उठवला आहे.
View this post on Instagram
अनुपम खेर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात ते आपले व्हिडिओ, फोटो आणि आमी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना देत असतात. नुकतंच अनुपम यांनी आपला लॉकडाऊन मधील अनुभव प्रेक्षकांशी शेअर केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
View this post on Instagram
अनुपम खेर म्हणाले, “माझ्यासाठी लॉकडाउनचा वेळ हा सकारात्मक वृत्ती देणारा होता. मी गेल्या 74 दिवसांपासून मुंबईच्या माझ्या घरी एकटाच आहे. पत्नी किरण खेर चंदीगडमध्ये आहेत. लॉकडाउन होण्यापूर्वी मी स्वत:ला खूप अस्वस्थ मानत असे. मला सगळीकडे जायचं असायचं. नेहमी घाई-घाईत असायचो. मला एका ठिकाणी बसणंदेखील शक्य नव्हतं. पण जेव्हा मी गेले 74 दिवस घरी बसलो होतो, तेव्हा मी एकटाच होतो. माझ्यात नक्कीच खूप बदल झाले आहेत.
या लॉकडाउनच्या दिवसांमध्ये मी स्वतःशी खूप काही बोललो. स्वतःला आणि इतर गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी स्वत:ला पुरेसं समजून घेतलं. काही मुद्देदेखील मी नोंदवून घेतले आहेत. कदाचित त्यातून एक पुस्तकदेखील होऊ शकेल. बाकी माझा मित्र अनिल कपूर मला अनेकदा घराबाहेर भेटायचा. गॅलरीमध्ये येऊन आम्ही गप्पा मारायचो. असं ते यावेळी म्हणाले.