शिवशंकर निरगुडे
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील दिड एकरवरील सोयाबीन पिक पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. आता शेतकऱ्यांवर हुमणीचे नवीन संकट आल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. आधीच शेतकऱ्यांनी विविध बँकेचे कर्ज घेऊन खरिपाची पेरणी केली आहें जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट देखील ओढवले होत. आधीच निसर्गाचा लहरीपना पाऊस आला तर ढगफुटी सदृश पडतो नाहीतर पडतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षीच मोठे नुकसान होत आहे.
सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील शेतकरी दशरथ निवृत्ती भोपळे यांच्या शेतांमध्ये हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे दिड एकर क्षेत्रामधील सोयाबीन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तर धोतरा येथील रामेश्वर थिटे यांच्या शेतातील झेंडूच्या कोवळ्या पिकांना हुमणी अळी मुळातून नष्ट करत आहे. शेतात मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. हुमणी अळी ही जमिनीखाली राहत असल्यामुळे यांचे नियंत्रण करणे अधिक अवघड झाले आहे. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व ज्या शेतकऱ्यांचे हुमणी अळीमुळे नुकसान झाले आहें त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.