“दंगल’ आणि “छिछोरे’ या चित्रपटांच्या तुफान यशानंतर दिग्दर्शक नितेश तिवारी लवकरच आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू करणार असल्याच्या चर्चा आता मनोरंजन विश्वात सुरू झाल्या आहेत. नितेश हे रामायणावर आधिरित चित्रपट काढणार अशा चर्चा आहेत. या चित्रपटात दीपिका आणि हृतिक हे कलाकार सीता आणि रामाच्या भूमिकेत असतील अशी चर्चाही सुरू झाली आहे.
मात्र अद्यापही संबधीत वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तर रावणाच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा विचार केला जात आहे. मात्र, सध्या ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नितेश यांनी दिली आहे.
अल्लू अरविंद, नमित मल्होत्रा आणि मधू मंटेना हे तिघेही रामायणावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत, तर नितेश तिवारी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा शिवधनुष्य पेलणार आहेत अशी माहिती चित्रपट च्विषयक माहिती देणाऱ्या एका वेब पोर्टलने दिली आहे.
या चित्रपटाची बोलणी तूर्त प्राथमिक स्वरुपाची आहे. या चित्रपटाच बजेट जवळपास 600 कोटींहून अधिकच असेन अशाही चर्चा आहेत. या चर्चांना अधिकृत दुजोरा कधी मिळेल या प्रतीक्षेत चाहते आहेत, कारण पहिल्यांदाच या तिन्ही सुपरस्टारना एका वेगळ्या भूमिकेत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.