नागपुर- राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने जी नवी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
देशमुख यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर नागुपरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
आमच्या सरकारने जाहीर केलेली ही कर्जमाफी टप्प्याटप्प्याने अंमलात येणार आहे असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने शेतकऱ्यांवर 30 सप्टेंबर 2019 पर्यंत असलेले दोन लाख रूपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्याची येत्या दोन महिन्यात अंमलबजावणी करण्याचे काम पुर्ण होईल त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल असे देशमुख म्हणाले.