मुंबई – निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सध्या करोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी, होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली घोषित करण्यात आली आहे.
हे नियम पाळले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश देखील गृहमंत्रालयाने दिले आहेत. “दहाच्या आत होळी लावणे बंधनकारक तसेच होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई. असे अनेक नियम राज्य सरकडून तयार करण्यात आले आहे.
‘हे’ असतील यंदाच्या होळी धुळवडीसाठी सरकारचे नियम
- रात्री दहाच्या आत होळी करावी
- दहाच्या आत होळी लावणे बंधनकारक
- डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर बंदी
- होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई
- महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी
- दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये,जोरात लावल्यास कारवाई
- कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये
- धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये