Hingoli Lok Sabha । राज्यात महायुतीमधील एका जागेचा वाद हा मिटला असल्याची मोठी बातमी समोर येतीय. हिंगोली लोकसभेसाठी असणारा वाद संपवत महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येतंय. काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत देखील हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा निर्णय घेत हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलली. त्यासोबतच तसेच, हेमंत पाटील यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला पहिल्यापासूनच भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सतत विरोध पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर भाजपने काल हिंगोलीत आढावा बैठक देखील बोलावली होती. या बैठकीत देखील हेमंत पाटील यांना महायुतीची उमेदवारी नकोच असा सूर उमटला. याचवेळी जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आल्या. तसेच हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम आम्ही करणार नसल्याची थेट भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकारी यांनी घेतली आहे. या सर्व घटनेची गंभीर दखल महायुतीमधील मुख्य नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, काल रात्री हेमंत पाटील यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आल्याची माहिती असून, त्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठक देखील झाल्याची माहिती मिळत आहे.
उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू? Hingoli Lok Sabha ।
भाजपकडून होणार विरोध पाहता तात्काळ हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सूचना सुद्धा दिल्या आहेत. तर, हेमंत पाटील यांच्या जागेवर बाबुराव कदम यांना उमेदवारी देता येऊ शकते का? याची सुद्धा चाचपणी शिवसेनेच्या वतीने केली जात आहे.
नवीन उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या खांद्यावर Hingoli Lok Sabha ।
विशेष म्हणजे भाजपने हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. उमेदवारी बदलण्याच्या मागणीनंतर उमेदवार बदलून नवीन उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या खांद्यावर दिली जाणार आहे.