शिरूर (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शिक्षक दत्ताञय जगताप यांनी आमदाबाद येथिल आदिवासी समाजाच्या कुटुबांना आपल्या शेतातील प्रत्येकी एक एक किलो याप्रमाणे दहा भाज्या गेली पंधरा दिवस त्यांनी मोफत दिल्या. समाजातील माणुसकीचा धर्म पाळून त्यांनी निरपराधांना मदत केल्याने परिसरातून त्यांचे चांगलेच कौतुक होत आहे.
लाखेवाडी (मलठण ता.शिरुर )येथिल जि.प.प्राथमिक शाळेवर ते शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र असे काम करीत आहे. हे पविञ कार्य करण्याबरोबरच ते नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत अनाथ ,गोरगरीबांना मदत करत असतात. तसेच ते प्रख्यात कवि असून त्यांची २ पुस्तके लिहली असून दोन पुस्तके प्रसिध्द झाली आहे. कोरोनावर त्यांनी लिहलेली कविता विशेष गाजली.
तसेच त्यांनी शिरुर तालूका मराठी पञकार संघाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आमदाबाद येथिल गरीब आदिवासी कुटूबांना मदत केली असून यापुढेही ते मदतीचे कार्य चालू ठेवणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यांच्या या कार्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.
यावेळी दत्ताञय जगताप म्हणाले की,या कोरोनाच्या महामारीमुळे गोरगरीब व निरापराध कुटूंबे उघड्यावर आली आहे. गेली दोन महिने लाँकडाऊनमुळे कोणताही कामधंदा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे स्वतः च्या शेतातील भाजीपाल्याबरोबरच इतरांच्या शेतातील भाजीपाला विकत घेवून तो या निरपराध कुटुबांना देत आहे. जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे,तहसिलदार लैला शेख शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे व केंद्रप्रमुख रामदास बोरुडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मदतीने आदिवासी ही गहीवरले
अचानक सकाळी आठ वाजता भाजीपाल्याची गाडी थेट झोपडी वर पोहचली पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते व शिक्षक दत्तात्रय जगताप यांनी मदतीला सुरवात केली . अचानक मिळालेल्या मदतीमुळे आदिवासी महीलांना गहीवरून आले व त्यांनी अन्न धान्य रेषनचे मिळाले आहे . आता भाजीची चिंता मिटली असल्याबदद्ल समाधान व्यक्त केले .