श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळापासून झाली उपक्रमाची सुरुवात
पुणे – उत्सवांच्या काळात स्वच्छतेचा जागर करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी “आरोग्योत्सव’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. याची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळापासून झाली. या उपक्रमांतर्गत मंडळ, सोसायट्यांमधील निर्माल्य-हार-नैवेद्य यांचे संकलन करून त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे.
माय अर्थ फांउडेशन आणि पतीत पावन संघटनेतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने आणि पुणे महापालिकेच्या सहकार्याने या आरोग्यत्सवाचे आयोजन केले आहे. उपक्रमाचा शुभारंभ रविवारी (दि.23) झाला. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, पर्यावरण तज्ज्ञ नितीन देशपांडे, दत्तात्रय देवळे, ललित राठी, लोकेश बापट, अनंत घरत, पतित योगेश वाडेकर, यादव पुजारी, विकी आंग्रे, विजय जोरी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, परेश खांडके, मनीष घरत, श्रीकांत मेमाणे उपस्थित होते.
उत्सव काळात अनेक ठिकाणी निर्माल्य, नैवेद्य विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. त्यामुळे अशा गोष्टी टाळायच्या असतील तर निर्माल्य कलशचा अधिकाधिक वापर नागरिकांनी करण्याचे आवाहन उपमहापौर शेंडगे यांनी केले.