पैं व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रितु होइजे । ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ।।68।। पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो । ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपांचि ।।69।। म्हणौनि आपणचि आपणयां ।
घातु कीजतु असे धनंजया । चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ।।70।। (अध्याय 6 वा) भ्रमाच्या शय्येवर बलवान अशा अविद्येच्या योगाने जीव जेव्हा झोपी जातो, देहालाच स्वतःचे स्वरूप समजून स्वतःच्या वास्तव आत्मस्वरूपाचे जीवाला जेव्हा अज्ञान असते,
तेव्हाच त्याला जन्म-मरणाची वाईट स्वप्ने पडू लागतात. पण नंतर त्याला गुरूकृपेमुळे आत्मस्वरूपाविषयी अकस्मात जागृती येते, तेव्हा ते पूर्वीचे सर्व स्वप्न मिथ्या आहे, असे त्यास सर्वकाळ यथार्थ ज्ञान प्राप्त होते.
असा आत्मबोध त्याच्या स्वतःच्या ठिकाणीच असतो. म्हणून भ्रमात सापडलेला जीव खोट्या देहाभिमानाकडे चित्त देऊन आपणच आपला घात करीत असतो. “अहम् ब्रह्मास्मी’ हे अद्वैत ज्ञान प्राप्त झाले की सर्व मिथ्या भासते.