मुंबई – झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी ही जोडी झळकली होती. या मालिकेतील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर गौतमी आणि विराजसची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गौतमी आणि विराजस आगामी प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकत्र येत आहेत. हे दोघे आगामी मराठी नाटकात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सोशल मीडियावर दसऱ्याच्या मुहूर्तावर चिन्मय मांडलेकरनेपोस्ट शेअर करत हि माहिती चाहत्यांना दिली आहे. ‘गालिब’ असे या नाटकाचे नाव आहे. ‘हुई मुद्दत कि ‘गालिब’ मर गया पर याद आता है, वो हर इक बात पर कहना कि यूँ होता तो क्या होता !’ असं कॅप्शन देत या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे.
View this post on Instagram
या नाटकात गौतमी – विराजस प्रमुख भुमिकेत आहेत. गालिब या नाटकाच्या दिग्दर्शन आणि लेखनची धुरा अभिनेता चिन्मय मांडलेकरने सांभाळली आहे. परंतु हे नाटक नेमकं कशावर आधारित असणार आहे. याबाबत अद्याप कोणतीहीमाहिती देण्यातआलेली नाही. मात्र गौतमी आणि विराजस या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत.