नवी दिल्ली – 2008 मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने शनिवारी चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर अन्य एका आरोपीला तीन वर्षांचा कारावास सुनावला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार पांडे यांनी या खटल्याचा निकाल देताना चारही आरोपींची शिक्षा ठोठावली. रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार अशी आरोपींची नावे आहेत. या चौघांना भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) दोषी ठरवण्यात आले होते.
या प्रकरणात अजय सेठी नावाच्या अन्य एका दोषीला तीन वर्षांच्या तुरुंगवास आणि ७ लाख २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्याला आयपीसी कलम 411 आणि मोक्का तरतुदींनुसार कट रचणे, संघटित गुन्हेगारीला मदत करणे किंवा जाणूनबुजून मदत करणे आणि संघटित गुन्हेगारीचे पैसे मिळवणे यासाठी दोषी ठरविण्यात आले होते. मात्र या खटल्यात तो आधीच कारावास भोगत असल्याने न्यायालयाने त्याची शिक्षा रद्द केली.
दरम्यान, टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हिची ३0 सप्टेंबर 2008 रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कारमधून घरी परतत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तिच्या हत्येमागे दरोडा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.