बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर म्हणाली की, ती भीती संपवण्याच्या दिशेने काम करत आहे. कारण भीती बाळगून जगू नये म्हणून मी खूप प्रयत्नशील आहे. ही अशी एक बाब (भीती) आहे ज्यावर प्रत्येकाने मात करणे आवश्यक आहे.
भीती हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे वाणीचे मत आहे. ती म्हणाली, भीती हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू आहे आणि आपल्या सर्वांसाठीच तो अडथळा ठरत असतो. यासाठी मला वाटते की, आपण सर्वांनी या एका गोष्टीवर विजय मिळविला पाहिजे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, वाणी आगामी काळात अनेक चित्रपटांत झळकणार आहे. “शमशेरा’ चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. याशिवाय “बेल बॉटम’मध्ये अक्षय कुमारसह ती काम करत आहे. तसेच अभिषेक कपूर यांच्या आगामी चित्रपटात आयुष्मान खुराणा-वाणी कपूरची जोडी दिसण्याची शक्यता आहे.