Success Story: अनेक विद्यार्थी जिद्द, चिकाटी आणि मोठ्या मेहनतीने मोठे यश संपादन करतात. अशाच एका IAS अधिकारी पदापर्यंत झेप घेतलेल्या विद्यार्थीची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत गरिबीत बालपण घालवलेल्या IAS अधिकाऱ्याने शाळेत जाण्यासाठी रोज 70 किमी प्रवास केला. एवढेच नाही तर वडिलांना मदत करण्यासाठी त्याने चहाच्या दुकानात कामही केले. परंतु हार न मानता हिमांशू गुप्ताने IAS पदापर्यंत मजल मारली.
उत्तराखंडच्या हिमांशू गुप्ता यांनी आपल्या मेहनतीने उत्तीर्ण होत IAS अधिकारी बनले. यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस झालेल्या हिमांशू गुप्ताचे वडील रोजंदारीवर काम करायचे. पैसे मिळवण्यासाठी ते चहाही विकायचा. हिमांशूच्या वडीलांना त्यांच्या मुलांना खूप शिकवायचे होते. यासाठी ते खूप कष्ट करत असत. हिमांशू शाळेत जाण्यापूर्वी ते वडिलांसोबत काम करत असतं.
पण काही जण त्यांना ‘चायवाला’ म्हणून चिडवू लागले. त्यामुळे जेव्हा जेव्हा वर्गमित्र त्यांच्या चहाच्या स्टॉलजवळून जात असत तेव्हा ते लपून बसत असल्याचे ते सांगतात. पण घरात मदत व्हावी यासाठी ते वडीलांना मदत करत असतं. घर चालवण्यासाठी सगळे मिळून दिवसाला ४०० रुपये मिळवायचो, असेही त्यांनी सांगितले.
‘या’ पद्धतीने शिकले इंग्रजी
हिमांशू गुप्ता यांनी सांगितले होते की, ‘माझी स्वप्ने मोठी होती. मी शहरात राहण्याचे आणि माझ्या कुटुंबासाठी चांगले जीवन जगण्याचे स्वप्न पाहिले. माझे वडील अनेकदा म्हणायचे, ‘स्वप्न साकार करायचे असेल तर अभ्यास कर.’ तर मी तेच केले. मला माहीत होते की जर मी कठोर अभ्यास केला तर मला प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळेल. पण मला इंग्रजी येत नव्हते, म्हणून मी इंग्रजी चित्रपटाच्या DVD विकत घ्यायचो आणि शिकण्यासाठी त्या बघायचो. सुदैवाने, मी माझ्या बोर्डात चांगले गुण मिळवले आणि मला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. माझ्या पालकांना कॉलेजच्या संकल्पनेची अधिक माहिती नव्हती, तरीही ते म्हणाले, ‘तुझ्या क्षमतेवर आमचा विश्वास आहे.’
हिमांशू गुप्ता पुढे म्हणतात की, ‘ सुरुवातीला मी घाबरलो होतो बोलणाऱ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मी अपरिचित वातावरणात होतो. पण माझ्याकडे एक गोष्ट होती जिने मला इतरांपेक्षा वेगळे केले, ते म्हणजे शिकण्याची भूक. मी माझ्या स्वतःच्या कॉलेजची फी देखील भरली, मला माझ्या पालकांवर ओझे बनायचे नाही. मी खाजगी शिकवणी दिली आणि ब्लॉग लिहिला. 3 वर्षांनंतर, मी माझ्या कुटुंबात पदवीधर होणारा पहिला व्यक्ती बनलो. यानंतर मी माझ्या विद्यापीठात अव्वल देखील आलो.’
तीन वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण
हिमांशू गुप्ता यांनी सुरुवातीला कोचिंग क्लास लावले नाही. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात ते अयशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी मेहनत घेतली आणि चौथ्या प्रयत्नात आयएएस अधिकारी झाले. हिमांशू गुप्ता यांनी 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, जेव्हा त्यांची भारतीय रेल्वे वाहतूक सेवेसाठी निवड झाली. तेव्हा त्यांनी 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलिस सेवेसाठी निवड झाली. त्यानंतर 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे.