ओतूर – रविवार दि.17 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान भाजी पाला वाहतूक करणारी पीकअप (नंबर एम.एच.14.एच.जी.1940.) ही ओतूर बाजूकडून कल्याण बाजूकडे जात असताना कल्याण बाजूकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा (नंबर एम.एच.03. बी . वाय.9023.) यांच्यात नगर कल्याण महामार्गावरील डिंगोरे व पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर जोरदार धडक झाली आहे.
या भीषण अपघातात रिक्षामधील चालक व 2 प्रवासी तसेच पिकअप मधील 5 जण असे एकूण 8 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक् पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
अपघातात एकूण पाच लोकांची ओळख पटली असून 3 लोकांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे. ओतूर पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती मिळताच स्वतः कांडगे व दहा पोलीस कर्मचारी अपघात स्थळी तात्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
अपघातातील ओळख पटलेल्या पीकअप मधील व्यक्तींची नावे –
1) गणेश मस्करे वय. 30 वर्ष (चालक मयत)
2) कोमल मस्करे वय. 25 वर्ष (चालकाची पत्नी)
3) हर्षद मस्करे वय. 4 वर्ष (चालकाचा मुलगा)
4) काव्या मास्करे वय. 6 वर्ष (चालकाची मुलगी)
5) अमोल मुकुंदा ठोखे राहणार जालना
रिक्षा मधील मयत लोकांची नावे खालील प्रमाणे –
1) नरेश नामदेव दिवटे वय 66 वर्ष (रिक्षा चालक) रा. पेडे परशुराम तालुका चिपळूण जि.रत्नागिरी.
इतर दोन अज्ञात इसम नाव पत्ता माहीत नाही.