आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 336वा पालखी प्रस्थान सोहळा शुक्रवारी (2 जुलै) झाले असून, यासाठी मोजक्याच निमंत्रितांना आमंत्रित करण्यात आले आहे. करोनासारख्या महामारीमुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पायी वारीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्णयाला हभप बंडातात्या कराडकर यांनी विरोध केला असून, आळंदीमधून पायी वारी वारकरी करणारच असल्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.
वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय! श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच! बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक!
विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय!
श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच!
बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता?
वारकर्यांचा असा अपमान?थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे!
तीव्र निषेध! https://t.co/I9WfssELOl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 3, 2021
काहीच मध्यम मार्ग नव्हता?, वारकर्यांचा असा अपमान?, थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे, याचा तीव्र निषेध, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.