मुंबई – “बाळासाहेबांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, हे अत्यंत क्लेशदायक… वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावल असं म्हणत आहे.
ते पुढे म्हणाले,’आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले ही, वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली. मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा.” अशी प्रतक्रिया राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
दरम्यान,शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.