– ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर
एऱ्हवीं विषयीं सुख आहे। हे बोलणेंचि सारिखें नोहे। तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे। जगामाजीं ।।113।। सांगे वातवर्षआतपु धरे। ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे। तरी त्रिमाळिकें धवळारें। करावीं कां ।।114।। म्हणौनि विषयसुख जें बोलिजे। तें नेणतां गा वायां जल्पिजे। जैसें महूर कां म्हणिजे। विषकंदातें ।।115।। (अध्याय 5 वा)
माउली म्हणतात, एऱ्हवी विषयात सुख आहे, हे बोलणे देखील योग्य नाही, त्याचे कारण असे की विजेच्या क्षणिक चमकण्याने जगात उजाडत नाही. तसेच विषयसुख क्षणिक सुख देणारे असते म्हणून ते सुख खरे नाही.
वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून संरक्षण जर ढगांच्या सावलीनेच झाले तर तीन मजली घरे बांधण्याचा उद्देश तरी काय? त्याप्रमाणेच विषयात खरेच समाधानकारक सुख असते तर आत्मसुखाची गरज पडली नसती. म्हणून विषयात सुख आहे असे जे बोलले जाते, ते त्याचा अर्थ न कळल्यामुळे व्यर्थ बडबड आहे.
जसे की कांद्याला मधुर म्हणावे. थोडक्यात विषय सुखात खरे सुख वाटत असले तरी त्याचे रुपांतर कालांतराने दुःखात होत असते. म्हणून क्षणिक विषय सूखापासून दूर राहणे सर्वोतोपरी योग्य आहे.