मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेमध्ये महिला अत्याचाराबाबत बोलताना, ‘महिला आज संरक्षण क्षेत्रात देखील उच्चपदावर आहेत, मात्र त्यांचे संरक्षण करण्यासाठी कुणीच नाही.’ अशी खंत व्यक्त केली.
“जेव्हा महिलांना त्यांच्या पेहरावावरून लक्ष केलं जातं तेव्हा मनाला अत्यंत वेदना होतात. हे रोखण्यासाठी संस्कारांची गरज असून ते घरापासून द्यायला हवेत.” असं मत देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
समाजातील महिला अत्याचाराच्या घटना वाढण्यामागे संस्कारांची कमतरता हे प्रमुख कारण आहे. असं मत देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.