नवी दिल्ली – कपिल सिब्बल यांना काँग्रेसची एबीसीडी माहीत नाही असा जोरदार निशाणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गांधी कुटुंबीयांच्या बचावासाठी पुढे येत सिब्बल यांच्यावर निशाणा साधला आहे. पाच राज्यात झालेल्या निवडणूकांमध्ये कॉंग्रेसला मोठे अपयश आले आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी गांधी कुटुंबाने कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्त्व सोडावे असे परखड मत व्यक्त केले होते.
अशोक गेहलोत म्हणाले की, “सर्व काही सोनिया गांधींच्या आशीर्वादानेच साध्य झाले आहे. कपिल सिब्बल यांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडणे दुर्दैवी आहे.त्यांना काँग्रेसची एबीसीडी माहीत नाही.” अशा निशाणा त्यांनी साधला आहे.
पाच राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पंजाबात सत्ता होती ते एकमेव राज्यही काँग्रेसने गमावल्यावर पक्षातील ‘जी 23’ गटाने पुन्हा एकदा आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. कपिल सिब्बल यांनी तर स्पष्टच सांगितले की, देशाच्या राजकारणात कॉंग्रेस पक्षाला स्थान कायम ठेवायचे असेल तर गांधी गांधी कुटुंबाने कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्त्व सोडावे.