मुंबई – शाहरुख खान आणि अजय देवगणनंतर आता तिसरे नाव पान मसाल्याच्या जाहिरातीतही पाहायला मिळत आहे. यावेळी अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीचे प्रमोशन सुरू केले आहे. त्यामुळे आता अक्षय चांगलाच अडचणीत सापडला आहे. अक्षय कुमारने टीव्हीवर ‘बोलो केसरी..’ बोलल्यानंतर, सेन्सॉर बोर्डाचे माजी प्रमुख पहलाज निहलानी यांनी अक्षयच्या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
I have no words to condemn the way Akshay Kumar has joined the gang of Amitabh Bachchan, Shahrukh Khan, Ajay Devgan to promote cancer through a surrogate advt of tobacco product. Ironically, all these people are Padmashri award winners. (more)
— Dr Shekhar Salkar (@dr_salkar) April 20, 2022
त्यानंतर आता गोवा भाजपच्या वैद्यकीय सेलचे निमंत्रक शेखर साळकर यांनी बुधवारी नरेंद्र मोदींना तंबाखू उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या जाहिरातींमध्ये कलाकार दिसल्यामुळे त्यांना पद्म पुरस्कारांपासून वंचित ठेवण्याचा आग्रह केला आहे. या संदर्भातील एक ट्विट सुद्धा सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
While @PMOIndia is working overtime to make India healthy through Fit India movement, the entire mission is humiliated by these so-called influencers with their surrogate advt trapping the younger generation into tobacco consumption. Do these actors really deserve Padmashri?
— Dr Shekhar Salkar (@dr_salkar) April 20, 2022
शेखर साळकर ट्वीट करत म्हणाले, ‘तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींद्वारे कर्करोगाचा प्रचार करण्यासाठी आता अक्षय कुमार देखील अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्या टोळीत सामील झाला असून यासाठी आता माझ्याकडे शब्द नाहीत. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ते पद्म पुरस्कार विजेते आहेत.”
पुढे साळकर म्हणाले की.., @PMOIndia फिट इंडिया मूव्हमेंटद्वारे देशाला निरोगी बनवण्यासाठी खूप मेहनत करत आहेत. पण हे संपूर्ण मिशन या तथाकथित प्रभावशाली लोकांमुळे उद्ध्वस्त होत आहे, जे त्यांच्या या जाहिरातींद्वारे तरुण पिढीला तंबाखूच्या आहारी जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. हे कलाकार खरोखरच पद्मश्रीला पात्र आहेत का?’ असा सवाल त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, या जाहिरातीमुळे अभिनेता अक्षय कुमार ह्याला देखील चांगलंच ट्रोल करण्यात आलं होत. मात्र, त्यानंतर आज अक्षयने सोशल मिपावर भली मोठी पोस्ट लिहत माफी मागितली आहे.