नवी दिल्ली – कापड आणि आणि तयार कपड्यावरील जीएसटी वाढऊ 15 टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. यामुळे 85 टक्के क्षेत्रावर परिणाम होईल. त्यासाठी हा निर्णय रद्द करावा अशी मागणी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यांच्या अर्थमंत्र्यांना असोसिएशनने हा निर्णय रद्द करावा असे आवाहन केले आहे. जीएसटी परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार जीएसटीमध्ये तब्बल सात टक्के वाढ करण्यात येणार आहे.
यामुळे या सर्व क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या क्षेत्रातील 15 टक्के उद्योगाने ही मागणी केली होती. मात्र ही मागणी मान्य केल्यानंतर इतर 85 टक्के उद्योगावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे या क्षेत्रातील छोट्या उद्योगावर जास्त परिणाम होणार असल्याचे या संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यामुळे या क्षेत्रातील बरेच उद्योग बंद पडतील. त्याचबरोबर ग्राहकांना तयार कपडे महागात पडतील. हे क्षेत्र अगोदरच अडचणीत आहे. जीएसटी वाढल्यानंतर या क्षेत्राच्या अडचणीत आणखी वाढ होईल. सरकारने या क्षेत्रातील सर्व बाबीवर सरसकट पाच टक्के जीएसटी लावण्याची सूचना या संघटनेने केले आहे.