काही दिवसांपूर्वी दिया मिर्झा आणि तिचा नवरा साहिल संघा हे विभक्त होत असल्याची बातमी आली. मात्र त्यांनी हा निर्णय अन्य महिलेमुळे घेतला असल्याची अफवा पसरली होती. दिया मिर्झाने ही अफवा स्पष्ट शब्दामध्ये फेटाळून लावली आहे. ती आणि साहिल दोघेही विभक्त होण्यामागे कोणतीही तिसरी व्यक्ती नाही, हे तिने स्पष्ट केले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून तिने हे स्पष्टिकरण दिले आहे.
आम्हाला आमचा वेळ मिळू द्या, अशी विनंती आम्ही दोघांनीही प्रसिद्धी माध्यमांना केली होती, याचीही तिने आठवण करून दिली आहे. सिनेसृष्टीतील लेखिका कनिका धील्लनबबरोबर साहिलेच अफेअर असल्यामुळेच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे काही इंटरनेट चॅनेलनी म्हणायला सुरूवात केली आहे. “जजमेंटल है क्या’ बनवणाऱ्या प्रकाश केवलामुडी आणि कनिका धील्लन पती-पत्नी होते.
मात्र आता हे दोघेही वेगळे झाले आहेत. दिया आणि साहिलच्या विभक्त होण्याशी आपला काहीही संबंध नाही, असे कनिकानेही ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. कनिकाच्या भूमिकेला दियानेही समर्थन दिले आहे. “केवळ महिला असल्याने तुला विनाकारण वादात ओढून तुझी प्रतिमा मलिन केली जात आहे.’ असे म्हणून दियाने दिलगिरी व्यक्त केली आहे.