भोर (प्रतिनिधी) – गवडी (ता.भोर) येथील शेतकऱ्यांनी बचत गटाच्या माध्यमातून शेती उपयुक्त वस्तू व बियाणे खरेदी करावी खाजगी सावकारीला बळी पडू नये त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे प्रतिपादन शेतकरी भूमिपुत्र बचत गटाच्या स्नेह मेळाव्याचे आयोजनप्रसंगी बोलत होते. यावेळी बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गृह उपयुक्त वस्तूचे वाटप करण्यात आले.
भोर तालुक्यातील डोंगरी भागातील शेतकरी भूमिपुत्र बचत गट म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी निर्माण केलेला बचत गट होय या बचत गटामध्ये २० सदस्य असून वार्षिक उलाढाल १५ लाख रुपयांपर्यंत होते.
या सदस्यांना शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या खते, वस्तू, अवजारे इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी या बचत गटाच्या माध्यमातून पैसे दिले जाते. हे शेतकरी खाजगी सावकारीला बळी पडू नयेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मिळणाऱ्या फायद्यातून शेतकऱ्यांना वस्तू वाटप करण्यात येते. या वर्षी बचत गटाच्या माध्यमातून सहा लिटरचा कुकर व मिठाईचे वाटप महवितरणे शाखा अभियंता सचिन साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष पटेल लतीफ, साळुंखे बाप्पाजी, रामेश्वर खांडेभराड, शेख महमूद भाई, सुदाम साळुंके, श्रीकांत साळुंके, दिलीप साळुंके, राऊ धाप्ते, चंद्रकांत कुमकर, मधुकर बांदल, विठ्ठल दुधाने, संजय साळुंके,अनंता साळुंके, सतीश बांदल, किसन साळुंके, विनायक साळुंके, हनुमंत शिळीमकर, किसन चंदनशिव, धनाजी साळुंके, अशोक धोंडे, किसन चंदनशिव, श्रीकांत साळुंखे इत्यादी उपस्थित होते. बाप्पाजी साळुंखे प्रास्ताविक केले. अशोक धोंडे यांनी आभार मानले.