कुसुमाग्रजनगरी (नाशिक) – कंगना राणावत अभिनेत्री म्हणून चांगली असली तरी तिच्या मताशी मी सहमत नाही. राजसत्तेतील काही लोकांकडून काही वदवून घेण्यासाठी वापर केला जात असावा किंवा आपल्यालाही पटत नसताना ठासून सांगण्याचा प्रयत्न केला जात असावा, असे मत अभिनेते आणि कवी किशोर कदम (कवी सौमित्र) यांनी केले.
येथे सुरू असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात संवाद लक्ष्यवेधी कवींशी या कार्यक्रमात कवी सौमित्र बोलत होते. ते म्हणाले, कवी असल्याने म्हणजेच संवेदनशील असल्याने नट म्हणून काम करतांना त्याचा परिणाम अभिनयावरही होतो.
त्यामुळे कवी आणि नट या दोन्ही भूमिकेत कविता माझ्या जगण्याचा अविभअज्य भाग बनला, या कार्यक्रमात संवादक डॉ.पृथ्वीराज तौर, डॉ.गविंद काजरेकर, कवी प्रफुल्ल शिलेदार, सुचिता खल्लाळ, खलील मोमीन, वैभव जोशी यांनी आपल्या कावितांविषयी व आपल्या जीवनपट उपस्थितांसमोर मांडला.
कविता हे संवेदनशील भूमिका मांडण्यासाठी अधिक उपयुक्त माध्यम आहे. त्यामुळे कवी आणि कवियत्री यांच्या भेद केला जाऊ नये. कविता उमटत असताना त्यात जगण्याची भीती डोकावत असते. ही भीती प्रत्येक कालावधीत होती. तशी भीती मलाही वाटत असते, असे सौमित्र यांनी स्पष्ट केले.
सभोवताली घडनाऱ्या घटनांच्या प्रतिक्रिया कवितेतून उमटल्या पाहिजेत. तर, कवी म्हणुन ते अभिव्यक्त व्हायला हवे, असे मत सुचिता खल्ल्याळ यांनी व्यक्त केले. कवीतेत काव्य अतिशय महत्वाचे असते मी कविता एन्जॉय करतो असे मत खलील मोमीन यांनी व्यक्त सांगितले.