पुणे – राज्य शासनाने घर, दुकान, जमीन या स्थावर मिळकतींच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्ताऐवजांवर मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) येत्या 31 मार्चपर्यंत सवलत दिली आहे. या सवलतीमुळे दस्त नोंदणीकरण्यासाठी शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होत आहे.
मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार पुढील चार महिन्यांत कधीही दस्त नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदवू शकतात, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी दिली. मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत आहे.
तसेच शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशी परिस्थिती असताना कार्यालयात गर्दी होणे योग्य नाही. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या सवलतीचा फायदा घेण्यासाठी आता मोजकेच दिवस राहिल्याने दुय्यम निंबधक कार्यालयात गर्दी होत आहे.
मुद्रांक शुल्क भरल्यानंतर दस्त…
या सर्व पार्श्वभूमीवर नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 23 अ नुसार मुद्रांक शुल्क भरल्याच्या दिनाकांपासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करण्याची तरतूद आहे. त्यामुळे स्थावर मिळकतीच्या व्यवहारासंदर्भात आता मुद्रांक शुल्क भरले तर दस्त नोंदणी पुढील चार महिन्यांपर्यंत करता येते. त्यामुले नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा. कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन पारखे यांनी केले आहे.