पिंपरी, (प्रतिनिधी) – राजकीय इच्छाशक्तीशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही. तसेच प्रमाणभाषेसोबतच बोलीभाषांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अरविंद दोडे यांनी केले.
चिंचवड येथे समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या साहित्य संवाद या उपक्रमात ‘मराठी भाषा’ या विषयावर अरविंद दोडे बोलत होते. पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय मराठी विभागप्रमुख प्रा. विद्यासागर वाघिरे, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा कार्यवाह डॉ. संजय जगताप, समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष उज्ज्वला केळकर, सीताराम सुबंध या वेळी उपस्थित होते.
प्रा. विद्यासागर वाघिरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. संजय जगताप म्हणाले की, महाराष्ट्रातील वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येक शाळेत आठवड्यातून दोन तास वाचन उपक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
कवी देवदत्त साने यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले. त्यामध्ये भरत बारी, सुनीता बोडस, रूपाली देव, अभिषेक मिटके, आत्माराम हारे, संजय खोत, राजेश चौधरी, आदेश कोळेकर, गणेश भुते, अभिजित काळे, अरुण कांबळे, हरिश मोरे, प्रदीप गांधलीकर, प्रा. प्रभाकर दाभाडे, सुरेश कंक, नंदकुमार मुरडे, नितीन हिरवे यांनी सहभाग घेतला. कैलास भैरट यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. मानसी चिटणीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जयश्री श्रीखंडे यांनी आभार मानले.