Devendra Fadnavis – अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची निमंत्रणे हा सध्या एक मोठा राजकीय इश्यू बनला आहे. विविध नेत्यांच्या त्या अनुषंगाने रोज नवनवीन प्रतिक्रिया येत आहेत. निमंत्रण राजकारणवरून मोदी सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचावर उद्धव ठाकरेंकडून टीकाही करण्यात आली अशात आता देवेंद्र फडणवीस यांनी बाबरीचा उल्लेख करत त्यांनी शिवसेनेलाही टोला लगावत आपली भूमिका मांडली आहे.
🕗 7.55pm | 2-1-2024 📍 Mumbai | संध्या. ७.५५ वा. | २-१-२०२४ 📍 मुंबई.
LIVE | Media interaction.#Maharashtra #Mumbai #RamMandir https://t.co/25Q0u0CmOK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 2, 2024
देवेंद्र फडणवीस म्हणाले,’प्रभू श्रीरामाचं मंदिर ५०० वर्षांच्या संघर्षानंतर तयार होत आहे. आज जो कलंक बाबरने लावला होता तो हटवण्याचं काम आम्ही करत आहोत. या देशाची आस्था असलेल्या रामाची मूर्ती मंदिरात असणार आहे. अशावेळी राजकारण करणं हे अत्यंत हीन दर्जाचं आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा सगळे मतभेद विसरुन रामापुढे हात जोडले पाहिजेत आणि संपूर्ण देश राममय कसा होईल ते पाहिलं पाहिजे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,’मी काही लोकांची पर्वाच करत नाही. जेव्हा कारसेवा करायची होती तेव्हा हे लोक लपून बसले होते. हे कुणीही कारसेवेसाठी गेले नाहीत. मी त्यांच्यावर काय बोलायचं? आम्ही कारसेवक आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. तिन्ही कारसेवांमध्ये मी गेलो होतो. असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेलाच टोला लगावला आहे.