नवी दिल्ली: भारतामध्ये दरवर्षी 5 लाख रस्ते अपघातांमध्ये दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. हे प्रमाण किमान 25 टक्क्यांनी कमी करण्याचे रस्ते वाहतूक मंत्रालयाने ठरविले आहे.
यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक मोहीम हाती घेतली आहे. ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात रस्ते अपघात होतात अशी 500 ठिकाणे निवडण्यात आली असून यासंदर्भात प्रवास करणाऱ्यांना अवगत केले जात आहे.
रस्ते अपघातामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होऊन त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
त्याचबरोबर बऱ्याच प्रमाणात पशुधनावर परिणाम होतो. हे प्रमाण या वर्षी 25 टक्क्यांनी कमी करून हळूहळू यामध्ये मोठी घट करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
वाहने सुरक्षित असावीत त्याचबरोबर रस्त्याची देखभाल वेळोवेळी केली जावी यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे रस्ते वाहतूक विभागाच अधिकाऱ्यानी सांगितले.