वाघोली- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे विशेषकरून “वाघोली’च्या समस्या निवारणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
वाघोलीचे शहरालगत असलेले स्थान, वेगाने वाढती लोकसंख्या यामुळे वाघोली परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावेळी पाणी, कचरा, वाहतूक कोंडी, वीज या समस्यांवर सविस्तर मुद्देसूद बैठक होऊन प्रत्येक समस्येसाठी कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला.
याप्रसंगी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सातव, वाघोली असोसिएशनचे संजीव कुमार पाटील, गणेश सातव पाटील, दिनेश गाढवे, माऊली सातव पाटील, योगेश पाटील, हर्ष बूटालिया, संदेश लोखंडे, संतोष कृष्णा, चेतन पगार, अक्षय गाडेकर आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.