नवीदिल्ली – देशभरात आज विविध प्रकारे विजयादशमीचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.महाराष्ट्रात काही ठिकाणी आपट्याची पानं सोन रुपी देऊन दसरा साजरा करतात तर काही ठिकाणी रावणाचे दहन करून विजयादशमी साजरी करतात. राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवाटी शहरात रावणाच्या अंताची अनोखी परंपरा आहे.
मेवाड भागात दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्यासह त्याच्या सैन्यावर बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार केला जातो. प्रथम, सैन्यावर गोळ्या झाडून त्यांचा खात्मा केला जातो. त्यानंतर रावणावर गोळ्या झाडल्या जातात. रावणावर बंदुकीतून गोळ्या झाडण्याची परंपरा सुमारे 125 वर्षांपासून सुरू आहे. उदयपुरवाटी येथील लोक या परंपरेचे पालन करतात. वेगळ्या पद्धतीने रावणाचा अंत पाहण्यासाठी केवळ उदयपुरवाटीच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमधूनही हजारो लोक येतात.
उदयपुरवाटी येथे नऊ दिवस रावणाला गोळ्या घालून मारण्याचा सराव केला जातो. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी माँ दुर्गेचा हवन केला जातो. शस्त्रांची पूजा केल्यानंतर सायंकाळी लोक मिरवणूक काढतात. मिरवणूक रावण दहनाचे ठिकाण असलेल्या नांगल नदीवर पोहोचते.रावणाची सेना मातीच्या मडक्यापासून बनलेली आहे. त्यावर पांढऱ्या रंगाने रंग देऊन डोळे आणि तोंड बनवले जातात. अशा स्थितीत रावणाच्या दोन्ही बाजूला मडक्यांची फौज बनवली जाते. त्यानंतर गोळ्या आधी सैन्याला आणि नंतर रावणाला घातल्या जातात.