बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी झालेल्या कॅनडाविरुद्धच्या लढतींत भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांनी विजय मिळवले व पदकाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले. पुरुष संघाने इंग्लंडविरुद्धचा सामना 4-4 असा बरोबरीत सुटल्यामुळे या सामन्यावर सर्वात जास्त लक्ष केंद्रित केले होते. हा सामना जिंकणे भारतासाठी स्पर्धेतील अव्हान कायम राखण्यासाठी आवश्यक बनला होता.
भारताने घानाविरुद्धचा सामना तब्बल 11-0 असा थाटात जिंकला होता मात्र, त्यानंतरच्या ईग्लंडविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या काही क्षणी बचाव कमी पडल्याने त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. या सामन्याच्या सुरुवातीलाच सातव्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत धडाक्यात सुरुवात केली.
त्यानंतर अमित रोहिदासने 10 व्या मिनिटाला गोल करत कॅनडाचा बचाव कमकुवत ठरवला. ललित कुमार उपाध्यायने 20 व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी 3-0 अशी वाढवली. गुरजित सिंगने कॅनडाच्या दुबळ्या बचावाचा लाभ घेत 27 व्या मिनिटाला गोल केला. तर 38 व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने गोल करत पहिला हाफ संपण्यापूर्वीच भारताला 5-0 अशी मोठी आघाडी मिळवून दिली.
दुसरा हाफ सुरू झाल्यावरही दबदबा भारताचाच राहिला. हरमनप्रीतने 56 व्या मिनिटाला गोल केला, तर मनदीप सिंगने 58 व्या मिनिटाला गेल केला. यानंतरही कॅनडाचा बचाव पुन्हा एकदा भेदताना आकाशदीपने 60 व्या मिनिटाला गोल केला. यानंतर कॅनडाला प्रयत्न करण्याचीही संधी मिळाली नाही व भारताने विजयासह स्पर्धेतील आव्हानही कायम राखले.