World Cup 2023 India vs Bangladesh Match : गेल्या शनिवारी (१४ ऑक्टोबर) एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने पाकिस्तानचा ७ विकेटने पराभव केला होता. या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी (Sehar Shinwari)सह पाकिस्तानी संघाचे चाहते बरेच निराश झाले. आता भारतीय संघाला हरवण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीने बांगलादेशी खेळाडूंना मोठी ऑफर दिली आहे.
टीम इंडियाचा सध्या (गुरूवार, 19 ऑक्टोबर) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध स्पर्धेतील चौथा सामना सुरू आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी (Sehar Shinwari)ने बांगलादेशच्या खेळाडूंना तिच्या ट्विटर अकाउटच्या(आताचे x) माध्यमातून ऑफर दिली होती. तिने म्हटले होते की, पुढच्या सामन्यात बांगलादेशने भारताला हरवल्यास ती त्यांच्यासोबत ‘फिश डिनर डेट’वर जाईल.
भारताविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवाच्या दुसऱ्या दिवशी (15 ऑक्टोबर) पाकिस्तानी अभिनेत्रीने ट्विट केले होते की , “इंशाअल्लाह, माझे बंगाली मित्र पुढच्या सामन्यात आमच्याकडून बदला घेतील. जर त्याचा संघ भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाला तर मी ढाक्याला जाईन आणि बंगाली बाॅयसोबत फिश डिनर डेट करेन.
InshAllah my Bangali Bandu will avenge us in the next match. I will go to dhaka and have a fish dinner date with Bangali boy if their team managed to beat India ✌️❤️ 🇧🇩
— Sehar Shinwari (@SeharShinwari) October 15, 2023
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेश संघाने तीनपैकी एकच सामना जिंकला आहे आणि दोन गमावले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना हा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सध्या चालू आहे.
या सामन्यात सलामीवीर फलंदाज लिटन दास आणि टी हसन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 256 धावांपर्यंत मजल मारली असून वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर 257 धावांचे लक्ष्य आहे.
बांगलादेशच्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दमदार झाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 146 धावा झाल्याअसून विजयासाठी आणखी 111 धावांची आवश्यकता आहे. सध्या क्रिजवर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 37*(32) धावांवर तर श्रेय्यस अय्यर हा 6*(7) धावांवर खेळत आहे. भारतीय संघाची फलंदाजी पाहिली तर भारताचा विजय जवळपास निश्चित आहे त्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी (Sehar Shinwari)सोबत फिश डिनर डेटची संधी बांगलादेशला मिळेल असं वाटत नाही.