चिंबळी -केळगांव येथे रस्त्यावर भामा आसखेड जलवाहिनीचे काम सुरू आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असल्याने रस्त्यावर पाणी वाहू लागले आहे. केळगाव-आळंदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे.
केळगाव येथील ओढ्यावर पुन्हा खड्डा पडला असल्याने रस्त्यावर धोका निर्माण झाला असल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालविणे मोठे कसरतीचे झाले आहे. येथे जड मालवाहू गाड्यांची वर्दळ सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.