पिंपरी -सध्याच्या काळात कामगार चळवळी अधिक बळकट होणे गरजेचे आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरूच ठेवा, असा सल्ला खा. शरद पवार यांनी कामगार नेते काशिनाथ नखाते यांना केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुंबई येथे भेट घेऊन कामगारांच्या प्रश्न मांडले. या वेळी मार्गदर्शन करताना खासदार पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या राजकीय परिस्थितीसोबतच कामगार, कष्टकरी, शेतकरी, बेरोजगारी या विषयावर या वेळी चर्चा झाली, असे नखाते यांनी सांगितले.
या वेळी खा. शरद पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, सध्याची असंघटित कामगारांची आणि बेरोजगारीची स्थिती बिकट आहे. कामगार संघटनानीं अग्रस्थानी राहून त्यांच्यावरील लादलेले संकट व कायदे दूर करण्यासाठी त्यांच्या नाय हक्काची लढाई प्रकर्षाने लढण्याची गरज आहे. ती सुरू लढाई सुरू ठेवावी असा सल्ला दिला अशी माहिती नखाते यांनी दिली.